मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात यंदा भीषण दुष्काळ पडला आहे. खरे तर भीषण असा शब्द वापरला तरीही दुष्काळाची तीव्रता शब्दांत सांगता येत नाही की मांडता येत नाही, ती फक्त अनुभवावी लागते. 19%2 साली संपूर्ण महाराष्ट्रात असाच मोठा दुष्काळ पडला होता. पाण्याअभावी केवळ माणसेच नव्हे, तर जनावरेही तडफडून मेली होती. 19%2 च्या दुष्काळाचीच फुटपट्टी लावायची झाली तर यंदाचा दुष्काळ त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये अगदी पहिल्या पानावर दुष्काळाच्या बातम्या झळकत आहेत. अगदी टीव्हीवर न्यूज चॅनल्सवरही दुष्काळाची दाहकता मांडली जात आहे. परंतु आम्हा मुंबईकरांना त्याचे काहीच सोयरसूतक नाही. मुंबईपासून फार तर साडे चारशे किमी अंतरावर मराठवाडा आहे. त्याठिकाणी लोक कसे जगतात, त्याची साधी कल्पनाही आम्हा मुंबईकरांना नाही. भारत आणि इंडिया यातील फरक या दुष्काळाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
मुंबईकरांना दुष्काळ कशाशी खातात, हे कदाचित कधीच कळणार नाही. कारण 24 तास नसले तरी नळाला पाणी येतेच. अगदी अनधिकृत झोपडपट्टयांमध्ये नळाचे पाणी बदाबदा वाहत असते. आणि समजा एखाद्या दिवशी काही कारणाने पाणी नाहीच आले तर महापालिकेच्या नावाने शंख करत, बिसलेरी पिऊन दिवस ढकलण्याची आम्हा मुंबईकरांची तयारी असते. एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला आणि महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून 15-20 टक्के पाणीकपात केली तरी आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते. पालिकेच्या नावाने कडाकडा बोटे मोडली जातात. मात्र दुष्काळी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहून आणि वाचूनही आपल्याला काहीच फरक पडत नाही. एवढया मुंबईकरांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत.
जे दुष्काळाचे, तेच लोडशेडिंगचे वीज भारनियमन म्हणजे काय, हे फार तर मुलुंडकरांना समजेल. परंतु मुंबईकरांनी स्वीच ऑन केला की, दिवा लागतो. रिमोटची कळ दाबली की एसी ऑन होतो. विजेअभावी जवळपास 40 टक्के महाराष्ट्र अंधारात असतो, परंतु मुंबईची स्कायलाइन नेहमी दिव्यांच्या झगमगाटाने उजळलेली असते. गरज नसतानाही विजेची उधळपट्टी सुरू असते. शनिवार-रविवारचा विकेन्ड असो, नाहीतर आठवडयाचा कोणताही दिवस, मॉल्स, बाजारपेठा, सिनेमागृहे गर्दीने तुडुंब भरलेली असतात. हॉटेल्सच्या बाहेर लोक ‘मेरा नंबर कब आयेगा’ म्हणून सहकुटुंब सहपरिवार रांगा लावून वाट पाहत असतात. अशावेळी मनात विचार येतो की, यापैकी कितीजणांना दुष्काळाबद्दल माहिती असेल? समजा यापैकी प्रत्येक कुटुंबाने एखाद्याला विकेन्डला हॉटेलऐवजी घरामध्येच जेवण केले तरी किती कोटी रूपये वाचू शकतील..? समजा आपल्यापैकी प्रत्येकाने यंदा आपला वाढदिवस साजरा केला नाही तर किती रूपये गोळा होऊ शकतील..? केवळ रूपयांनी दुष्काळग्रस्तांचे सगळे दुःख हलके होणार नाही, हे खरे. परंतु निदान दुष्काळासारख्या जीवन-मरणाच्या विषयावर आपण एवढी तरी संवेदनशीलता दाखवली तरी त्यांच्यासाठी काहीतरी केल्याचे समाधान मिळेल. सरकार नावाच्या यंत्रणेवर आपला विश्वास नसेल तर एखाद्या चांगल्या सेवाभावी संस्थेच्या किंवा सचोटीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत थेट दुष्काळग्रस्तांपर्यंत आपण मदत पोहोचवू शकतो. अगदी तेवढेही करायची इच्छा नसेल तर निदान घरात किंवा कुठेही सतत गळणारा नळ दुरूस्त करून पाण्याचा अपव्यय तरी टाळता येणे अगदीच अशक्य नाही. जिथे विजेची गरज नाही, पंख्याची गरज नाही, अशाठिकाणी लाइट-पंख्याचे बटन स्वीच ऑफ केले तरी बराच फरक पडू शकतो.
किमान एवढी जरी संवेदनशीलता आपण मुंबईकरांनी दाखवली तर फार काही नाही, पण समाधानाची झोप नक्कीच येईल
- सुनील घुमे
मुंबईकरांना दुष्काळ कशाशी खातात, हे कदाचित कधीच कळणार नाही. कारण 24 तास नसले तरी नळाला पाणी येतेच. अगदी अनधिकृत झोपडपट्टयांमध्ये नळाचे पाणी बदाबदा वाहत असते. आणि समजा एखाद्या दिवशी काही कारणाने पाणी नाहीच आले तर महापालिकेच्या नावाने शंख करत, बिसलेरी पिऊन दिवस ढकलण्याची आम्हा मुंबईकरांची तयारी असते. एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला आणि महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून 15-20 टक्के पाणीकपात केली तरी आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते. पालिकेच्या नावाने कडाकडा बोटे मोडली जातात. मात्र दुष्काळी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहून आणि वाचूनही आपल्याला काहीच फरक पडत नाही. एवढया मुंबईकरांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत.
जे दुष्काळाचे, तेच लोडशेडिंगचे वीज भारनियमन म्हणजे काय, हे फार तर मुलुंडकरांना समजेल. परंतु मुंबईकरांनी स्वीच ऑन केला की, दिवा लागतो. रिमोटची कळ दाबली की एसी ऑन होतो. विजेअभावी जवळपास 40 टक्के महाराष्ट्र अंधारात असतो, परंतु मुंबईची स्कायलाइन नेहमी दिव्यांच्या झगमगाटाने उजळलेली असते. गरज नसतानाही विजेची उधळपट्टी सुरू असते. शनिवार-रविवारचा विकेन्ड असो, नाहीतर आठवडयाचा कोणताही दिवस, मॉल्स, बाजारपेठा, सिनेमागृहे गर्दीने तुडुंब भरलेली असतात. हॉटेल्सच्या बाहेर लोक ‘मेरा नंबर कब आयेगा’ म्हणून सहकुटुंब सहपरिवार रांगा लावून वाट पाहत असतात. अशावेळी मनात विचार येतो की, यापैकी कितीजणांना दुष्काळाबद्दल माहिती असेल? समजा यापैकी प्रत्येक कुटुंबाने एखाद्याला विकेन्डला हॉटेलऐवजी घरामध्येच जेवण केले तरी किती कोटी रूपये वाचू शकतील..? समजा आपल्यापैकी प्रत्येकाने यंदा आपला वाढदिवस साजरा केला नाही तर किती रूपये गोळा होऊ शकतील..? केवळ रूपयांनी दुष्काळग्रस्तांचे सगळे दुःख हलके होणार नाही, हे खरे. परंतु निदान दुष्काळासारख्या जीवन-मरणाच्या विषयावर आपण एवढी तरी संवेदनशीलता दाखवली तरी त्यांच्यासाठी काहीतरी केल्याचे समाधान मिळेल. सरकार नावाच्या यंत्रणेवर आपला विश्वास नसेल तर एखाद्या चांगल्या सेवाभावी संस्थेच्या किंवा सचोटीच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत थेट दुष्काळग्रस्तांपर्यंत आपण मदत पोहोचवू शकतो. अगदी तेवढेही करायची इच्छा नसेल तर निदान घरात किंवा कुठेही सतत गळणारा नळ दुरूस्त करून पाण्याचा अपव्यय तरी टाळता येणे अगदीच अशक्य नाही. जिथे विजेची गरज नाही, पंख्याची गरज नाही, अशाठिकाणी लाइट-पंख्याचे बटन स्वीच ऑफ केले तरी बराच फरक पडू शकतो.
किमान एवढी जरी संवेदनशीलता आपण मुंबईकरांनी दाखवली तर फार काही नाही, पण समाधानाची झोप नक्कीच येईल
- सुनील घुमे
No comments:
Post a Comment